छत्रपती संभाजी नगर : भारतीय (india) सैन्यामध्ये 2005 ला भरती झालेला रवींद्र भागवत पाटील हा देशसेवा करीत असताना 2010 पासून याचा आपल्या कुटुंबाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. आई वडिलांनी बऱ्याच वेळेस सैन्य (army) कार्यालयासोबत ( army office)
संपर्क केला परंतु टाळाटाळ करून आम्हाला उडवा उडीचे उत्तरे देण्यात येत आहे. अशे आई वडील म्हणतात. दोघे पती-पत्नी आज वयोवृद्ध झालेले आहेत. आम्ही सदरील मुलावर अवलंबून होतो आमच्या म्हातारपणाचा तो आधार आता राहिलेला नाही हे वृद्ध जोडपे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. आम्हाला या बाबतीत लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी ते करत आहेत.