शरद पवार कडाडले; पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली

13

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणावर टीका केली. शरद पवारांचे राजकारण कसे गडबडले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं किती नुकसान झालं याचा गौप्यस्फोटही केला. एवढेच नाही तर अजित पवार यांनी शरद पवारांना आराम करण्याचा सल्ला दिला. निवृत्त होण्याचा सल्ला दिला. अजित पवारांच्या या भाषणाला शरद पवारांनीही चिरफाड केली. जे गेले त्यांना जाऊ द्या. त्यांना आनंदी होऊ द्या. महाराष्ट्रात आपण नवीन कर्तृत्वान पिढी तयार करू, असं सांगत अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. चिन्ह कोठेही जात नाही. चिन्ह कुठलीही निवडणूक ठरवत नाही. असा माझा अनुभव आहे. आम्ही गाय वासरू, बैलजोडी, चरखा, पणजा यावर निवडणूक लढवली आहे. घड्याळावर लढले. काही फरक पडला नाही. कुणी सांगत असेल चिन्ह आम्ही घेऊन जाऊ तर चिन्हं जाऊ देणार नाही. चिन्ह जाणार नाही. जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतकरणात पक्षाचा विचार आहे. तोपर्यंत चिंता करण्याचं कारण नाही, अस शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादीला सोबत का घेतलं?

राष्ट्रवादी भ्रष्ट आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर राष्ट्रवादीला सोबत का घेतले? म्हणजे हे राज्यकर्ते पाहिजे ते बोलत आहेत. ते लोकांमध्ये वातावरण निर्माण करत आहेत. काही लोकांनी बाजूला होण्याचा निर्णय घेतला. आता त्याच लोकांसोबत जाणे म्हणजे त्या मतदारांची फसवणूक आहे. विचारधारेला विरोध करणाऱ्यांसोबत जाणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

बघून येतो म्हणून गेला अन्…

एक नेते तुरुंगात गेले. सहा महिने आत होते. आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न केला. ते तुरुंगातून आल्यावर अनेकांनी म्हटलं त्यांना संधी देऊ नका. ते तुरुंगात गेलेले आहेत. निकाल लागेपर्यंत त्यांना तिकीट नको. मी म्हटलं त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्यांना तिकीट दिलं. त्यांना मंत्री केलं. पहिल्या दोन मंत्र्यांमध्ये त्यांचं नाव होतं. त्यांचा दोन दिवसांपूर्वी फोन आला. सकाळी म्हणाले, काय चाललंय. बघतो. जातो. बघून येतो म्हणून गेले अन् मंत्रीपदाची शपथ घेतली, असंही त्यांनी सांगितलं.

Google search engine