नागपूर : लोकांचा विश्वास आता राज्य सरकारवर राहिला नाही. हे नापास झालेले सरकार आहे. कितीही प्रयत्न केला तरी डॅमेज कंट्रोल होऊ शकत नाही. हे सरकार दुतोंडी आहे. फडणवीस (fadanvis) यांनी खोटा कायदा आणून मराठ्यांना 16 टक्के आरक्षण ( arakshan) देण्याचं काम केलं. मराठ्यांना कुणबी करू असे म्हणत आता सरकारने फसगत करू नये. सातत्यानं कुणबी मराठ्यांमध्ये भांडण लावण्याच काम फडणवीस-शिंदे सरकारकडून सुरू आहे. असा घणाघात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( nana patole) यांनी केला.
नागपुरात आयोजित पत्रपरिषदेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस-शिंदे सरकारचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, अहमदनगरचे नाव बादलण्याचा निर्णय स्वागतहार्य आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी पुरोगामी विचार दिला. पण त्या विचाराने सरकारने काम करावं. केवळ नाव देण्याची घोषणा करून खिरापत वाटण्याचं काम सुरू आहे. अहिल्यादेवी मातेसारख सरकारनं करावं, त्या पद्धतीने राज्यकारभार करावा. औरंगाबादच्या नावाचा घोळ अद्याप कायम आहे. सरकारने भूमिका स्पष्ट करावी. शहराचे नाव बदलून भाजपला फायदा होणार नाही. मागील 9 वर्षांपासून विश्वगुरू म्हणणाऱ्यांनाही फायदा होणार नाही.
नागपूर कोर्टात फडणवीस यांनी दोन गुन्हे लपवले, त्यात वकिलांनी माहिती लपवली असे सांगितले, कोणाची दिशाभूल करत आहे. मराठा कुणबी हे काय चाललं महाराष्ट्रात. कुणबीला किती आरक्षण आणि मराठ्यांना आरक्षण किती स्पष्ट करावे. मराठा व कुणबी समाज जागृत आहे. हा डाव यशस्वी होणार नाही. मराठा समाजाची ओबीसीतून नव्हे तर स्वतंत्र्य आरक्षण देण्याची मागणी होती. ओबीसी समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला देणार आहे असे सांगून, राजकीय पोळी शेकण्याचं काम भाजप सरकारच आहे. आयोग नेमण्याचा अधिकार सरकारला नाही, राज्य विधिमंडळात कायदा करून समाजाची फसवणूक केली. शब्दफेक करून कुणबी मराठ्यांत भांडण लावण्याचे काम करत आहे.